Monday 18 May 2015

'अरुणा'स्त

 

42 वर्ष एक वेदना घेऊन ती जगत होती... जगत होती, किंवा कदाचित आला दिवस पुढे ढकलत होती. तिच्या संवेदना कोणीच शब्दात मांडू शकणार नाही. ती 'जगली' 24 वर्ष आणि 'मृत्युपंथावर' होती 42 वर्ष! अरुणाच्या जीवन-मृत्यूचा हा अजब खेळ 18 मे रोजी अरुणोदय झाला तेव्हा संपला.

गेली 42 वर्षांत आजूबाजूच्या जगात कितीतरी गोष्टी बदलत आहेत, पण तिच्या वर्षानुवर्षांच्या दिनक्रमात जरासाही फरक पडला नाही. नाही म्हणायला तिच्या तरुण शरीरावर वार्धक्याच्या खुणा दिसू लागल्या. तिचे केस पांढरे झाले, सुरकुत्या आल्या. तिचा श्वास आणि ह्रदय सुरु होतं, मात्र तिच्यासाठी काळ 27 नोव्हेंबर 1973 च्या त्या रात्रीच थांबला.

कोण होती अरुणा?

कारवारमधल्या हल्दीपूर या छोट्याशा गावातून आलेली अरुणा मुंबईत येऊन जनसेवेसाठी नर्स झाली. केईएममध्ये नोकरी करत असताना तिथल्याच एका डॉक्टरशी तिचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांचं लग्नही ठरलं. पण तिथेच नोकरी करणार्‍या सोहनलाल वाल्मिकीनेही तिला लग्नासाठी विचारलं. तिने नकार दिल्याने त्याला राग आला.

काय झालं त्या रात्री ?

अरुणाने नकार दिल्याच्या खुनशीतूनच सोहनलालने तिच्या गळ्यात कुत्र्याची साखळी बांधून तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी तिच्या मानेतल्या नसा बंद झाल्या त्या कायमच्याच. तेव्हापासून तिची शक्ती, वाचा, दृष्टी, संवेदना सारं काही गेलं.

सोहनलालला पुण्यात अटक झाली, शिक्षाही झाली ती चोरी आणि खुनाच्या प्रयत्नासाठी. प्रत्येकी सात वर्षं आणि तीही एकत्र भोगायची. तो बाहेर आला आणि बदला घ्यायचा म्हणून केईएममध्ये दाखल असलेल्या तिच्या बेडची रेलिंगच काढून टाकली. खाली पडल्याने तिला जखमा झाल्या.

तिचा एकेकाळचा प्रियकर आणि भावी नवरा असलेल्या डॉक्टरने दुसरं लग्न केल होतं. तिच्या नातेवाईकांनीही तिला सोडलं होतं. तिच्यावर बलात्कार करुन तिला या अवस्थेत आणून सोडणार्‍या सोहनलालने आपली शिक्षा पूर्ण केली होती. दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये तो उजळ माथ्याने नोकरीही करत होता.

सामाजिक कार्यकर्त्या पिंकी विराणी यांनी अरुणावर पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव 'अरुणाज स्टोरी'. हेच पुस्तक मराठीत अक्षर प्रकाशनाने 'अरुणाची गोष्ट' या नावाने आणलं. विनय आपटे यांनी 'कथा अरुणाची' हे नाटक रंगमंचावर आणलं.

ज्या केईएम रुग्णालयात माणुसकीशून्य सोहनलाल होता, त्याच ठिकाणी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या नर्स आणि डॉक्टर्सही होते. केईएमच्या मॅनेजमेंट, डॉक्टरांनी आणि सर्वांनीच तिला आपलं मानलं आहे. तिच्यावर एवढी वर्षं उपचार सुरु आहेत. पण त्यात उपकारांच्या भावनेचा लवलेशही नाही.

तिला दयामरण देण्याची मागणी झाली तेव्हा देशात वादळ उठलं. सुप्रीम कोर्टाने तिच्या दयामरणाचा प्रश्न निकाली काढला आणि केईएममधल्या नर्सनी जल्लोष साजरा केला.

अरुणाबरोबर काम करणार्‍या नर्सेस केव्हाच रिटायर झाल्या आहेत. पण नंतरच्या पिढीनेही तिचा प्रेमाने सांभाळ केला आहे. ती खोली गेली 42 वर्षं राखीव आहे.

अरुणा यांच्या मृत्यूने एका पर्वाचा अंत झाला. अरुणामुळे देशाला दयामरणाचा कायदा मिळाला. म्हणजे कुठल्या ना कुठल्या रुपाने अरुणा तिचा सेवाभाव पुरवतच राहिली. ती गेली आणि सकाळीच 'अरुणा'स्त झाला.

Wednesday 6 May 2015

आहार आणि आरोग्य


आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. आहार आणि आरोग्य यांविषयी लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पारंपरिक भारतीय आहाराचे महत्त्व, घरच्या जेवणाची लज्जत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या यूथ आयकॉन ठरलेल्या दिवेकर यांनी पटवून सांगितली. 'जे आवडते तेच खा' असा मूलमंत्र देत चौरस आहाराचे महत्त्व पटवून दिले. करिना कपूरसारख्या अभिनेत्रीपासून ते कॉर्पोरेट जगतातील उच्चपदस्थांपर्यंत अनेकांना सल्ला देणाऱ्या आणि विक्रमी खपाची तीन पुस्तके लिहिणाऱ्या दिवेकर यांच्यासोबतच्या संवादाने अनेकांच्या प्रश्नांचे निरसन झाले.

नियोजनबद्ध आहार कोणता?
आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.

वाढलेली चरबी कशी कमी करावी?
आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.

कोणती फळे खावीत?
आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

मधुमेहासाठी आहार कसा असावा?
खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.

शुगर-फ्रीचा वापर करावा का?
शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते. 

वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?
वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.

कडधान्य कशी खावीत..
आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?
शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.

आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?
शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.
आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?
आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.

दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?
सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.

घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?
चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.

वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?
वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?
सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.

साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?
प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा.

तुमच्या कामाची सुरुवात कशी झाली?
मी काम साधारण १९९९ मध्ये काम सुरु केलं. त्यावेळी सामान्य माणसे फिटनेस तज्ज्ञांकडे वळत नसत. त्यावेळी लाली धवन आणि फराह यांना मी सर्वप्रथम मार्गदर्शन केलं. त्यानंतर २००३ सालापासून आपल्या अर्थव्यवस्थेत बदल झाला. अनेक लोक या शाखेकडे वळू लागले आणि मग माझं या क्षेत्रातलं नियमित काम सुरू झालं.

केस, त्वचेसाठी काय सल्ला द्याल?
केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

आपला दिवस कसा असतो?
मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.
............

महिलांचे नोकरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरात पतीने मदत केली, तरच कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखण्यास पत्नीला मदत होऊ शकते. नोकरी करून पुन्हा घरातील कामांचा डोंगर सांभाळताना महिलांची कसरत होते. त्यामुळे स्वयंपाकातील लहान कामांमध्ये मदत केल्यास कमी वेळात उत्तम स्वयंपाक तयार होण्यास निश्चित मदत होईल.

  • दर दोन तासांनी खा
  • फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा
  • नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा
  • जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या
  • जेवणानंतर एखादे फळ खा
  • संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात
  • रात्री ८.३० च्या दरम्यान हलका आहार घ्या
  • हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.

‘From Where I See’ - A Book Review

Introduction:
Open any newspaper and all you see is strife, conflict and humans making life hell for other humans. Doesn’t the question ‘Why is this happening?’ creep into your mind on seeing this? Many people question the cause of all these problems but don’t really look for the answers. In his book ‘From Where I See’, author Dr. Ajay Yadav tries to delve beneath the surface and find answers to these situations that stem from the beliefs of men.

About the Author:
Dr. Ajay Yadav is a consultant anesthetist, intensivist and pain specialist. His textbook of anesthesia is the most sold textbook for medical undergraduates in India, Southeast Asia and Africa. He is a rational, logical and analytical thinker and is fond of reading, travelling and long distance running. It had always been his dream to write a book which can unfurl the other side of curtain.

Overview of the Book:
Ajay meets his childhood friend Shruti on a social network site. He finds her to be struggling with intrapersonal, interpersonal, inter-social and inter-religious conflicts. Eventually the conflicts kill her. Even if the police solve the case, will it prevent hundreds of Shrutis from getting killed?

How long will we think of ‘who’ killed as more important than ‘what’ killed a person? Till we don’t address this issue and work on it, many Shrutis will keep on getting killed. We need to cure the disease, not just the symptoms.

This book is an effort by the author to find the root cause and probable remedies of conflicts, and tries to explore hundreds of pertinent questions like “Why does it become so easy to get volunteers to blow up themselves and others for the sake of religion? Does religion divide or unite? What precipitates extramarital affairs? Is the immature and wrong interpretation of female emancipation the reason for a 13 fold rise in divorce rates in the last 5 years?

It’s not only a book, it’s the path to revolution, a journey towards an utopian world. Accepting the truth is the toughest job in the world. If you feel that you are open minded, have the courage to accept the truth and a desire to change the world. Be a part of the change and take the first step to build a road to the ideal world.


My Opinion on the Book:
This is one of the nice books that I have read in recent times because it raises a lot of questions in the mind of reader. And along with that it also gives a very good solutions for them.

The main highlight of this book is the concept of Uthopian World. I will give 5 stars for the concept of Uthopian word and recommend this book to those readers who like to read about the utopian world.

However in some parts the book are very lengthy and the reader tends to become bore. The author could have cut down somewhere and made it more crisp.
Other Details:
Publisher            : LiFi Publications Pvt Ltd
Author                :  Ajay Yadav
Edition                : 1
No of pages        : 403 pages
Publication Year  : February 1, 2015
Language            : English
Binding                : Paperback

This review is a part of the biggest Book Review Program for Indian Bloggers. Participate now to get free books!